पोस्ट्स

फूड फॉर थॉट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मेयाझगन

इमेज
  मेयाझगन हा तामिळ सिनेमा बघून महिना झाला पण त्याची गोडी अजूनही मनात तशीच रेंगाळून आहे. हा सिनेमा आजच्या घडीच्या सिनेमा पेक्षा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा आहे, आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांचा आपल्या मनाच्या पटलावर खोल परिणाम होता, काही गोष्टी कायमच्या रुतून बसतात आणि आयुष्यभर सलत राहतात आणि आतून आपल्याला बदलून टाकतात. काही गोष्टी आपल्या चांगुल पणामुळे आपल्या हातून घडून जातात ज्याला आपण जास्त महत्व देत नाही पण त्याचा दुसऱ्याच्या जीवनावर फार मोठा परिणाम होऊन त्याच आयुष्य बदलून जातात ज्याची आपल्याला किंचित ही कल्पना नसते. काही नाती दूर राहिल्याने तुटल्यासारखी वाटतात पण तिच नाती अचानक समोर येऊन आपल्यावर एवढं प्रेम करतात की जीव गुदमरून जातो आणि आपण खरंच त्या प्रेमाच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न उभा राहतो. हा सिनेमा म्हणजे नोस्टेलजियाचे एक सुंदर उदाहरणं आहे. आपले लहानपण आठवून त्या आठवणीत रमून जाऊन लहानपणीच्या सवंगड्या बरोबर काही काळ घालवणे किती आल्हाददायक असतें  हे ह्या सिनेमात दाखवलं आहे. लहानपणी भावकीच्या भांडणामध्ये अरुण स्वामीला आपले घरं सोडावे लागते जी गोष्ट त्याच्या कायमची जिव्...

विश्वविजेता गुकेश

इमेज
  तो विषविजेता बनला अवघ्या अठराव्या वर्षी, जगातील सर्वात तरुण विषविजेता, एवढ्या कोवळ्या वयात एवढं मोठं यश, अश्या यशाने एखाद्याने स्वतःला फार मोठा तीसमारखा समजून जिंकताच नाचून थयथयाट मांडला असता पण तो शांत होता त्या स्थितीत पण शांत होता.सर्वप्रथम त्याने चेसच्या सोंगट्या परत जागेवर लावल्या आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांना नमन करून आपला आदर प्रगट केला, त्याने चेस ला प्रणाम केला आणि नंतर भावना अनावर होऊन तो रडला. तो आपले संस्कार आपली शिस्त ह्या परमोच्च यशाच्या क्षणी पण विसरला नाहीं आणि अश्या वागण्याने त्याने लाखो लोकांच्या हृदयात कायमची जागा बनवली. कुठून येते एवढी प्रगल्भता, धन्य ते गुकेश चे पालक ज्यांनी असं रत्न घाडवलं. ह्या Attitude of gratitude मुळेच तो जगजेत्ता बनला, असा जगजेत्ता पुन्हा होणं नाहीं, सलाम गुकेश 🙏🙏🙏 ©   जितेंद्र मनोहर शिंदे

युतीचा धर्म

इमेज
युतीचा धर्म सगळ्यांनी पाळला, कमळाने धनुष्या बरोबर घड्याळाला पण साथ दिली आणि मशाल तुतारीने हाताबरोबर मिळवणी केली. सगळं कसं लिहून दिल्यासारखं घडवण्याचा प्रयत्न झाला आणि आम्ही सर्व एक आहोत म्हणून नेते मंडळींनी जनतेसमोर आणाभाका घेतल्या. प्रचाराच्या फडामध्ये सगळं कसं वरवर ठीक होतं आतलं राजकारण मात्र वेगळंच चाललं होतं, आतल्याआत मशाल हाताला भारी पडत होती आणि तुतारी वाजवायला हात पुढे होतं न्हवता. कमळाच आणि धनुष्यच गणित तसं दिसायला चांगलच जुळलं होतं पण घड्याळ कधी कधी चुकीची वेळ दाखवत होतं.  युतीत सगळ्यांचं बरळण चालू होतं कारण ज्याला त्याला आपलाच एक्का चालवायचा होता, कोण मोठा कोण लहान ह्या संभ्रमात सगळेच होते कारण प्रत्येकाचा इतिहास फार मोठा कर्तृत्ववान होता. सगळे जण अजूनही त्या आपल्या इतिहासात रममाण होते आणि वस्तुस्थिती पासून थोडे दूरच होते. रेल्वेचे इंजिन आणि वंचित पण मोठ्या आत्मविश्वासाने भरून गेले होते.  प्रचाराच्या रणधुमाळीत सामान्य कार्यकर्ता संभ्रमातच राहिला कधी काळी ज्या हाताला शिव्या दिल्या आणि ज्याच्या बरोबर रस्त्यावर उतरून लढाया लढून चार गुन्हे आपल्यावर घेतले त्या हाताला आज स...

कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाई माझी

इमेज
मृग नक्षत्र आल्या नंतर सृष्टी हिरवा शालू ओढून सजते, पावसाच्या आगमनाने मन प्रफुल्लित होऊन जीवनात पण नवी पालवी फुटते. पावसाच्या आगमनानानंतर आपल्या संस्कृती मधील अनेक सण सनावळींना सुरवात होते. आधी नागपंचमी, वटपौर्णिमा, पंढरीची वारी, श्रावण महिन्याचे उपास तपास, व्रत वैकल्य, पाठोपाठ दहीकाला, रक्षा बंधन आणि नंतर येतो गणपती बाप्पा, मग दसरा, दिवाळी. अगदी दिवाळी पर्यंत कसा सगळं कॅलेंडर ब्लॉक असते.   हे येणारे सारे सण हर्षोउल्हासात साजरे करताना एक औरच मजा असते. काही सण महिलांसाठी असतात पण घरात मंगलमय वातावरण निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा येते, हे सण सनावळी घराघरात चैतन्य निर्माण करतात, सणामुळे नातेवाईक एकत्र येतात, भाऊ बहीण, मित्र परिवारात जवळीक वाढते आणि त्याच्यामुळेच सामाजिक सलोखा राखण्यास मदत होते, संस्कृती संवर्धन होऊन ति एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचते. आपल्या ह्या महान संस्कृतीनेच आपल्याला ह्या  सण सनावळींची भेट दिली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे सारे सण निसर्गाला अनुसरून साजरे केले जातात आणि निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिले आहे त्याचे आभार मानण्यासाठी निसर्गाची पूजा ...

नया दौर : आर्टिफिशियल इंटिलिजंस

इमेज
सत्तर च्या दशकात नया दौर नावाचा सिनेमा आलेला होता, बदलत्या जमान्यानुसार होणारे बदल दर्शवणारा आणि जुनी आणि नवीन जीवन पद्धतीतील संघर्ष दाखवणारा एक सुंदर चित्रपट. आता सत्तरचे दशक उलटून पाच दशके झाली आणि जर सत्तर च्या दशकात नया दौर आला होता तर आताच्या जमान्यात त्याची कितवी आवृत्ती चालू असेल ते समजून घ्यायला पाहिजे. बदल हा काळाची गरज आहे आणि तो टाळणे अटळ आहे पण त्या बदलाला आपण कसे सामोरे जातो ते महत्वाचे आहे.  असे म्हणतात कि माणूस पण हळू हळू विकसित होत गेला, वेळेनुसार बदल घडत माणसाचे आताचे रूप आले आणि पुढे कदाचित हे रूप बदलेल पण. डायनासोर काळानुसार स्वतःला बदलू शकले नाहीत म्हणून नामशेष झाले, बदल हा टाळता येत नाही, सर्वात प्रथम बदला बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे, त्याच्या मुळे  होणारे फायदे, तोटे आणि बदलणारे आपले जीवनमान ह्याचा आढावा घेऊन त्या बदलाला हळू हळू अंगिकारले पाहिजे त्याच्या मध्येच सगळ्यांचे भले असते.                                      ...

जागतिक महिला दिन 2024

इमेज
जागतिक महिला दिनाच्या सर्व नारीशक्तीला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृती मध्ये नारीला उच्च स्थान आहे . आपल्या देवी देवतां मध्ये विद्येची देवता सरस्वती, शक्तीची देवता पार्वती आणि धनाची देवता लक्ष्मी आहे , ' यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता ' अर्थात जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवता वसतात.  छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाबाई एक आदर्श नारी होती, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ होऊन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले, ताराराणी ने अखंड झुंज देऊन स्वराज्य टिकवले आणि शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडले , झाशीची राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपली आहुती दिली ,अश्या अनेक रणरागिणींनी आपला इतिहास भरलेला आहे. ख्रिस्तपूर्व काळात गार्गी नावाची महान तत्वज्ञानी , वेदशास्त्रात पारंगत विद्वान स्त्री होऊन गेली जिच्या हुशारीची चर्चा अजून हि होते. आपल्या भारत वर्षांमध्ये अनेक विद्वान , कर्तृत्ववान स्त्रियांनीं जन्म घेतला आणि आपापल्या काळात त्यांनी इतिहास घडवला. स्त्री हि समाजात समान अधिकाराला पात्र होती आणि अनेक राजघराण्यांमध्ये राजमातांचा शब्...

नाळ

इमेज
आई जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळी बाळाला आईबरोबर जोडणारी नाळ असतें, हीच नाळ बाळाला पोटामध्ये असताना अन्न पुरवठा करत असतें. बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला आई पासून वेगळे करण्यासाठी हि नाळ कापावी लागते आणि नंतर बाळाचा एक स्वतंत्र प्रवास सुरु होतो. हिजी नाळ आहे ती जशी आई बरोबर बाळाला जोडते तशीच रक्त्याच्या नात्याची नाळ माणसाला कितीही दूर असला तरी आपल्या मूळ नात्यांकडे ओढत असतें. त्याचे मूळ गाव जेथे त्याचा जन्म आणि बालपण गेलेले असतें, त्याच्या लहान पणाच्या आठवणी, मित्र मैत्रिणी, शाळा, कॉलेज आणि अनेक गोष्टी त्याला आपल्या मुळाशी ओढत असतात पण अनेक वेळा रोजमाराच्या धावपळीच्या जिंदगीत तो आपल्या मुळापाशी वारंवार पोचू शकत नाहीं पण ती नाळ त्याला वारंवार आठवण देत असतें आणि ओढ कायम असतें. रक्ताच्या नात्यांची ओढ काही औरंच असतें, भावा भावा मध्ये असणारी ओढ, भावा बहिणी मध्ये असणारी ओढ आयुष्य भर टिकून असते फक्त ती दिसून येतं नाहीं किंवा आजकाल माणसे जास्तच प्रॅक्टिकल व्हायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे ती ओढ दबून गेलेली असतें पण संपलेली कधीच नसते. सगळ्या नात्यांमधला ओलावा तसाच असतो पण माणूस वर वर रुक्ष पणे ...

मनाचिये गुंती

इमेज
खूप दिवसापूर्वी एक कहाणी वाचली होती , एक माणूस आपल्या मुलांना घेऊन बागेत जातो तिथे त्याची मुले खूप दंगा मस्ती करत असतात ज्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो पण त्या माणसाचे त्याच्याकडे लक्षच नसते आणि तो आपल्या तंद्रीत असतो.  सगळे जण रागावून त्याच्याकडे कंप्लेंट करायला येतात आणि त्याच्यावर खूप ओरडू लागतात मग तो भानावर येऊन काय झाले हे विचारतो तेव्हा सगळे जण त्याला त्याच्या मुलांनी दिलेल्या त्रासाबद्दल सांगतात , तो माणूस सगळ्यांची माफी मागतो आणि सांगतो कि ह्यांची आई आज सकाळीच देवाघरी गेली आणि त्यांना खेळण्यासाठी मी इथे घेऊन आलो आहे. ह्या प्रसंगांमधून दिसून येते कि बाहेरून आपण कधीही माणसाची पारख करू शकत नाही , तो माणूस बागेत आला होता पण त्याच्या मागची कहाणी काही औरच होती. असाच प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी उलझलेला असतो , तो जसा दिसतो तसा खरंच असेल ह्याची खात्री नसते , प्रत्येक जण आपल्या  मानसिक द्वंदा मध्ये गुरफटलेला असतो आणि आपली एक लढाई लढत असतो ज्या मध्ये अर्जुन पण तोच असतो आणि कृष्ण पण तोच असतो , हि लढाई कोणालाच माहीत नसते पण ती सतत चालू असते , हा संघर्षच माणसाला एका उंची...

कॉफी विथ नौटंकी

इमेज
जगामध्ये अनेक हस्ती आहेत ज्यांनी आपल्या अभूतपूर्व यशाने जगामध्ये नाव कमावले , त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उठवला आणि ते त्या क्षेत्राचे हिरो बनले. अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये प्रत्येक जण आपला ठसा उठवतात जसे क्रीडा , कला , राजकारण, चित्रपट आणि आता सध्या फेमस होत असवणारे सोशल मीडिया चॅनेल्स. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्याने मिळवलेले यश लपून राहू शकत नाही आणि क्षणार्धात बातमी पसरून तो किंवा ती हिरो बनते, अनेक वाहिनीनवर बातमी पसरते , मुलाखती चालू होतात, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन अनेक यंगस्टर त्यांना फॉलो करायला तयार होतात. त्यांना मिळालेले यश कधी कधी टिकून राहते किंवा लवकरच लोग त्यांना विसरून जातात कारण यश मिळवणे कठीण आहे पण टिकवणे त्याहून कठीण. अश्यावेळी हे क्षणकाळाचे स्टार आपापल्या पर्सनल ब्रॅण्डिंग वर काम करायला लागतात , काहीही करून , येन केन प्रकाराने ते लोकांच्या दृष्टी समोर राहू पाहतात. लोकांनी त्यांना सर्च करावे किंवा त्यांना विसरून न जावे तसेच त्यांच्या क्षेत्रात त्यांना सतत काम मिळावे म्हणून अशी लोक आपल्या भोवती एक वलय बनवण्याचा प्रयत्न ...

बकेट लिस्ट २०२४

इमेज
                                                                         नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी जोरात केले आणि आता हळू हळू २०२४ ची तारीख लिहिणे आपल्या हातवळणी पण होऊ लागले आहे. नवीन वर्ष, नवीन आशा, अनेक इच्छा आकांक्षा. नेहमी प्रमाणे पहिले काही दिवस नवीन वर्षासाठी केलेल्या संकल्पा नुसार अनेकांनी दिनक्रम चालू पण केला असेल. कदाचित योगा, ध्यान, चालणे, धावणे, वाचणे, लिहिणे आणि बरेच काही चालू केले असेल, काहींचा दिनक्रम अजूनही चालू असेल तर काहींनी बासनात गुंडाळून त्याला राम राम ठोकला असेल. संकल्प करणे चांगलेच आणि त्यांना पूर्णत्वाला नेणं अजूनही चांगले पण ह्या संकल्पा बरोबर एक दुसरी  गोष्ट करू शकतो ज्याला म्हणतात बकेट लिस्ट.  राहून गेलेले काहीतरी ज्याची इच्छा आपण लहानपणी, तरुणपणी किंवा एखाद्या नाजूक प्रसंगी केलेली असतें, ती इच्छा किंवा तिच्या सारख्या अनेक इच्छा मन...

थोडा है , थोडे कि जरुरत है

इमेज
''थोडा है , थोडे कि जरुरत है '', प्रत्येक जणांच्या आयुष्यातील हि सत्य परिस्थिती. अगदी बिलिअनर पण कदाचित हाच विचार करत असतील. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात काही ना काही इच्छा धरून असतो त्यातील सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही आणि पूर्ण झाल्या तरी तो पर्यंत नवीन इच्छांची भर पडलेली असते आणि मग परत परिस्थिती पुन्हा येऊन पोचते ''थोडा है थोडे कि जरुरत है'' वर. सगळ्यांना आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची कमीच भासते , बाईक वाला कार इच्छितो , साधी कार वाला लक्झरी कार , लक्झरी कार वाला चार्टर प्लॅन अशी इच्छांची रांग वाढतच जाते , प्रत्येक जण 'थोडा और थोडा और' च्या चक्रात अडकलेला असतो.  ह्या थोडा और च्या मागे सर्वात मोठे कारण असते तुलना करण्याची वृत्ती , प्रत्येक जण आपली तुलना दुसऱ्या बरोबर करत असतो. सकृत दर्शनी समोरचा त्याला जास्त सुखी दिसतो आणि त्याच्या कडे असणारी प्रत्येक गोष्ट आपणाकडे पण आली कि आपण पण तेवढेच सुखी होऊ असे ज्याला त्याला वाटते , समोरच्या कडे असणाऱ्या भौतिक गोष्टींवरून त्याच्या सुखाची व्याख्या केली जाते.  ज्याच्या कडे जास्त भॊतिक गोष्टी , लक्झरी...

कृतांत

इमेज
  नुकताच कृतांत सिनेमा बघायचा योग आला, वर्क लाईफ बॅलेन्स वर बोलणारा आणि माणसाने क्षणिक सुखामागे न पळता थांबणे पण महत्वाचे आहे हे अधोरेखित करणारा. आजकालच्या धावपळीच्या दुनियेत जोतो रेस मध्ये लागल्या सारखा पळत आहे, त्याला दुसऱ्यांसाठी, समाजासाठी क्षणाचीही उसंत नाही आहे. अगदी घरातील जिवाभावाच्या माणसांत मिसळणे हि आता दुर्मिळ झाले आहे .सकाळी लवकर उठून इतर कामगार जसे कामावर जातात तसे लॅपटॉप उचलून जाणारे कामगार पळत पळत कामावर पोचतात, जायची वेळ फिक्स असते पण यायची वेळ फिक्स नसते. दिवसागणीची कामे संपतात पण जबाबदाऱ्या संपत नाहीत, भविष्याचा विचार करून कंपनीच्या स्ट्रेटीजी नुसार अनेक आवाहनात्मक प्रोजेक्ट समोर उभे असतात आणि त्यांना सकसेसफुली कंप्लिट करण्यासाठी मग झोकून दिले जाते स्वतःला पूर्णवेळ कामामध्ये, अनेक प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रेझेंटेशन बनवली जातात, हे प्रेझेंटेशनचे दृष्टचक्र लवकर संपतच नाही.  ह्या कामाच्या आणि जबाबदारीच्या बोझ्याखाली सगळे अशे काही दबले गेलेले आहेत कि पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ चा बॅलेन्स सांभाळणे आजकाल अगदी कठीण झाले आहे. घरी आई वडील, बायको किंवा न्हवरा आणि मुले...

अभिमन्यू चक्रव्यूह मे फस गया है तू I

इमेज
  महाभारतातील अभिमन्यू सगळ्यांनाच परिचित आहे. युद्ध काळात रचलेल्या सर्वात कठीण अश्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा त्याने प्रयत्न केला होता पण अर्धवट ज्ञानाने तो ते पार करू शकला न्हवता आणि वीरगतीला प्राप्त झाला होता. आपल्या मातेच्या उदरात असताना भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान त्याची माता सुभद्रेला संगितले होते पण ते ऐकता ऐकता ती झोपी गेली आणि अर्धवटच ज्ञान अभिमन्यू पर्यंत पोचू शकले. आजच्या कलियुगात पण एक सर्वसाधारण माणूस अश्याच अनेक चक्रव्यूहात सापडलेला दिसतो आणि जीवन जगण्याची कला पूर्ण पणे आत्मसात न केल्याने तो ह्या चक्रव्यूहातुन बाहेर पडू शकत नाही आणि पूर्ण आयुष्य ह्या चक्रात फसून  गेलेला असतो.  सर्वात पहिले चक्रव्यूह आहे ते प्रदूषणाचे, हे प्रदूषण आपण स्वतःहुन ओढून घेतले आहे. माणूस जसा जसा प्रगत होत जात आहे तसा तसा तो पर्यावरणाचा नाश करायला उठला आहे. कारखान्यांच्या धुरांड्यांमधून ओकणारा धूर, गाड्यां मधून निघणारा धूर, अनेक उपकरणांच्या वापराने होणारे ग्रीन हौसे गॅसेसचे उत्सर्जन, प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, शेतीसाठी वापरात येणारी अनेक प्रकारची केमिकल आणि त्यामुळे उतरलेली मात...

ऍडव्हरटायझिंगची दुनिया - एक मायाजाल ( Advertising-An Illusion)

इमेज
  ऍडव्हरटायझिंग हा मार्केटिंगचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशिवाय कोणतेही प्रॉडक्ट यशस्वी होऊच शकत नाही. ऍडव्हरटायझिंगची कला दिवसांदिवस खूपच प्रगत होत जात आहे. कस्टमरना लुभावण्यासाठी, त्यांच्या काळजात हात घालण्यासाठी अनेक टेकनिक वापरल्या जातात. काही ऍडव्हरटायझ  मनाला  इतक्या  भुरळ पाडतात कि त्या वर्षानुवर्षे हृदयावर राज्य करतात,  त्यांच्या कॅप्शन आणि जिंगल  मनात  खोल  जाऊन बसतात. जस्ट डू इट - नाईक, दिमाग कि बत्ती जाला दे - मेंटॉस, दाग अच्छे है - सर्फ एक्सेल ह्या कॅप्शन आणि अमूल दूध पिता है इंडिया, वॉशिंग पावडर निरमा ह्या जिंगल वर्षानुवर्षे फेमस आहेत आणि एखाद्या फेवरीट गाण्यासारख्या आपल्या हृदयाच्या कोन्यात जागा बनवून आहेत. अनेक मॉडेलनी आपल्या करिअरची सुरवात ऍडव्हरटायझिंगनि केली आणि आत्ता त्या चित्रपट सृष्टीत फेमस तारका आहेत, अनेक क्रिकेटरनि आणि सेलिब्रिटीजनि ऍडव्हरटायझिंगच्या जीवावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. हे सेलिब्रिटीज जनतेसाठी आयकॉन असतात आणि जनता त्यांचे अनुकरण करून ब्रँडकडे आकर्षित होते. हि ऍडव्हरटायझिंगची दुनिया आहेच अशी चकमकीत...

गुड व्हाइब्स ओन्ली (Good Vibes Only)

इमेज
  ''दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती'', अशी दिव्यत्वाची प्रचिती येते दिव्य माणसांकडून जी आपले जीवन जगाच्या कल्याणासाठी वाहून देतात. दैनंदिन जीवनात अशी माणसे मिळणे विरळेच पण काही माणसे जरूर मिळतात ज्यामुळे हृदयी वसंत फुलतो, मन फुलपाखरू बनते. अशी माणसे नेहमी जवळ असावी असे वाटते, अश्या माणसांकडून एक वेगळीच ऊर्जा आणि पॉसिटीव्हिटी मिळते ज्याला आपण गुड व्हाइब्स बोलतो.   जीवनात गुड व्हाइब्स मिळण्यासाठी फक्त माणसं नाही तर परिस्थिती पण तेंव्हडीच जबाबदार असते. ज्यावेळी आपण आपल्या आवडत्या नयनरम्य हॉलिडे स्पॉट वर जातो त्यावेळी पण आपल्याला गुड व्हाइब्स मिळतात. एखादा सुंदर चित्रपट, सुंदर गाणे, सुंदर डान्स, मित्रमैत्रिणींचा साथ पण आपल्याला गुड व्हाइब्स देऊन जातो. गुड व्हाइब्स मिळण्यासाठी चांगली संगती, चांगली परिस्थिती जरुरीची आहे आणि ती निर्माण करणे काही अंशी आपल्या हातात आहे. जेव्हढे आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहतो, चांगले विचार करतो तेव्हढेच जास्त गुड व्हाइब्स आपल्या नशिबात असतात.  एखादा सुंदर रोमँटिक कुटूंबवत्सल सिनेमा बघून मिळणाऱ्या सुंदर व्हाइब्स ह्या एखाद्या हि...

सत्तेचा घोडेबाजार

इमेज
                                                                     नेता मोठा कि पक्ष मोठा ? नेता मोठा कि पक्षाचा सिद्धांत मोठा ? पक्ष मोठा कि नेता मोठा ? पक्ष मोठा कि नेत्याचा सिद्धांत मोठा ? एखादा पक्ष मोठा कि देश मोठा ? पक्षाने नेत्याला बनवले कि नेत्याने पक्षाला बनवले ? पक्षातील नेत्यांसाठी काम करायचे कि पक्षाच्या सिद्धांतांसाठी काम करायचे ? नीतिमूल्ये जपणाऱ्या नेत्याला आपला मानायचे कि सगळी नीतिमूल्ये चुलीत घालून फक्त सत्तेसाठी लाचार होणाऱ्या नेत्याला आपला नेता मानायचे ? राजकारणात सर्व काही क्षम्य असते का ? एकाने केली तर गद्दारी आणि दुसऱ्याने केली तर मुत्सद्देगिरी, संधीचे राजकारण करणाऱ्यांना डोक्यावर बसवायचे कि पायतानाने हाणायचे ? राजकारण राजकारण ह्या नावावर किती खपवून घ्यायचे ?  आज देशामधील राजकारणाची परिस्थिती बघता असे अनेक प्रश्न वारंवार मनात येतात, अरे कुठे न्हेऊन ठेवलंय राजकारणाला. आज राजकारणातील नीति...