पोस्ट्स

मराठ्यांचा इतिहास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वेडात मराठे वीर दौडले सात

इमेज
  24 फेब्रुवारी 1674,  जगाच्या इतिहासात अजरामर असा रणसंग्राम घडला होता. स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली सहा स्वामीनिष्ठ पराक्रमी मराठे बहलोल खानाच्या बारा हजाराच्या वरच्या सैन्यावर चालून गेले होते. हा इतिहास आहे अजोड स्वामीनिष्ठेचा, अतुलनीय पराक्रमाचा, आपल्या देवासमान राजाच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणाऱ्या मर्द मराठ्यांचा. बहलोलखान ज्या वेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याला कायमचा ठेचून काढण्यासाठी राजांनी प्रतापराव गुजरांना धाडले. प्रतापरावांनी बहलोलखानाचे पाणी तोडण्यासाठी उमराणीच्या जलाशयावर कब्जा करून त्याला कैचीत पकडले. खानाचे सैन्य, त्याचे हत्ती पाण्याबिगर हैराण झाले. त्याच्या एका हत्तीने बेफाम होऊन खानाच्याच सैन्याला पायाखाली चिरडले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खानावर आक्रमण करून प्रतापरावांनी त्याला आपल्या पायाशी लोळवले. खान शरण आला आणि आपल्या जीवाची भीक मागू लागला. शरणागताला मारणे ही माणुसकी नाही असे समजून प्रतापरावांनी खानाला माफी दिली. पण खान सुधरण्यातला न्हवता त्याने पुन्हा स्वराज्यावर हल्ला करून मिरज, कोल्हापूर सारखी शहरे लुटली. ज्या वे...

पानिपत : मराठ्यांची शौर्य गाथा

इमेज
                                                                          14 जानेवारी 1761, पानिपत चा रणसंग्राम म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची, स्वामीनिष्ठेची, देशभक्तीची, अचाट पराक्रमाची अजरामर गाथा. मराठ्यांनी केलेली पराक्रमाची शर्त, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तव्यासाठी, देश सरंक्षणासाठी स्वतःला झोकून द्यायची वृत्ती ह्यातून दिसून येते. नाना पाटेकरचा प्रसिद्ध डायलॉग 'मराठा मारता है या मरता है ' कदाचित याच रणसंग्रामा वरून आला असेल. ह्या युद्धाची जर पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर 1758 नंतर पूर्ण उत्तरेत मराठा साम्राज्य एक जबरजस्त ताकत म्हणून उदयास आले होते. मराठ्यांनी लाहोर पर्यंत दौंड मारून अहमदशहा अब्दाली च्या मुलाला हुसकावून लावले होते. दिल्ली चा बादशहा नावापुरता राहिला होता आणि मुघल साम्राज्याचा बिमोड करून मराठ्यांचा डंका पूर्ण उत्तरेवर गाजत होता. रोहील ख...

बचेंगे तो और भी लडेंगे

इमेज
                         इ तिहासात अनेक योद्धे होऊन गेले. आपल्या अतुलनीय शौर्य,अदभुत पराक्रम ,प्रगल्भ बुद्धिचातुर्य,  बाणेदारपणा आणि अप्रतिम साहसाने त्यांनी इतिहासात नाव कोरले. यातील अनेक योद्धे आता इतिहासाच्या पटलावरून पुसून जात आहेत, त्यांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आपण विसरून जात आहोत कारण आपण त्यांचा इतिहास कधी नीट शिकतच नाही आणि त्याच्या पासून शिकवण घेऊन आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत  नाही. प्रत्येकाचा कार्यकाळ  एक तप आहे आणि त्यांनी केलेले महान कार्य आपल्याला आयुष्यात प्रचंड प्रेरणादायि आहे . यांच्याच पंक्तितला एक महान योद्धा ज्याने आपल्या बाणेदारपणामुळे आणि अतुलनीय पराक्रमाने इतिहासात नाव कोरले - "दत्ताजी शिंदे ". " बचेँगे तो और भी लडेंगे " ह्या त्यांच्या बाणेदार उत्तराने इतिहास घडवला. योद्धा कधी हार मानत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतो हे दत्तजिने पुऱ्या जगाला शिकवले. 10 जानेवारी 1760 रोजी दत्ताजी शिंदे नजिब खान रोहीला बरोबर लढताना धारातीर्थी पडले. भीषण रणतान्डवात दंडाला गोळी लाग...