नाळ

आई जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळी बाळाला आईबरोबर जोडणारी नाळ असतें, हीच नाळ बाळाला पोटामध्ये असताना अन्न पुरवठा करत असतें. बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला आई पासून वेगळे करण्यासाठी हि नाळ कापावी लागते आणि नंतर बाळाचा एक स्वतंत्र प्रवास सुरु होतो. हिजी नाळ आहे ती जशी आई बरोबर बाळाला जोडते तशीच रक्त्याच्या नात्याची नाळ माणसाला कितीही दूर असला तरी आपल्या मूळ नात्यांकडे ओढत असतें. त्याचे मूळ गाव जेथे त्याचा जन्म आणि बालपण गेलेले असतें, त्याच्या लहान पणाच्या आठवणी, मित्र मैत्रिणी, शाळा, कॉलेज आणि अनेक गोष्टी त्याला आपल्या मुळाशी ओढत असतात पण अनेक वेळा रोजमाराच्या धावपळीच्या जिंदगीत तो आपल्या मुळापाशी वारंवार पोचू शकत नाहीं पण ती नाळ त्याला वारंवार आठवण देत असतें आणि ओढ कायम असतें. रक्ताच्या नात्यांची ओढ काही औरंच असतें, भावा भावा मध्ये असणारी ओढ, भावा बहिणी मध्ये असणारी ओढ आयुष्य भर टिकून असते फक्त ती दिसून येतं नाहीं किंवा आजकाल माणसे जास्तच प्रॅक्टिकल व्हायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे ती ओढ दबून गेलेली असतें पण संपलेली कधीच नसते. सगळ्या नात्यांमधला ओलावा तसाच असतो पण माणूस वर वर रुक्ष पणे ...