Posts

Showing posts with the label फूड फॉर थॉट

कर्मा रिटर्न्स

Image
                                                               भगवतगीतेत म्हटले आहे तू कर्म करत जा फळाची इच्छा करू नकोस. खरच माणसाचे कर्मच सगळे काही आहे. आज आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ती आपल्या कर्माची फळे आहेत, आपले कर्म आपला पिच्छा कधीच सोडत नाही. जर तुम्ही आयुष्यात चांगले केले असेल तर तुम्हाला चांगलेच मिळेल , वाईट कर्माची फळे पण कदाचीत ह्या जन्मातच मिळणार असतात,  कारण आता सगळे काही इन्स्टंट आहे, दुसऱ्या जन्मासाठी वाट पाहायला कदाचित देवाला पण वेळ नाहि आहे. ह्या कर्माचा प्रत्यय अनेकदा येतो. आयुष्यात आपल्या हातून जे काही घडले असेल ते कुठेतरी नोंद होत असते आणि योग्य वेळी त्याच्या मोबदल्यात आपल्याला चांगली किंवा वाईट फळे रिटर्न गिफ्ट म्हणून मिळत असतात. आयुष्यात आपण कितीही चांगले वागलो असो पण आपल्या हातून कधी एक चूक झाली असेल तर समाजाला ती चूकच कदाचित आयुष्यभर लक्षात राहते आणि तेच आपले आयुष्यभरासाठी केरक्टर बनते ,म्हणून च   म्हणतात ना चूज़ युवर वर्ड्स वाइजली . जितके वर्ड्स चूज़ करणे महत्वाचे आहे actions पण तितक्याच महत्वाच्या आहेत, आयुष्यात कुठल्याही सिचुयेशनला जर लगेच रीएक्ट केले तर क

ये उन दिनोंकि बात है

Image
                                                                          ये उन दिनोंकि बात है  बघता बघता आयुष्य सरले आणि वयाची चाळीशी पार झाली, पण मुलांकडे बघितले की वाटते ह्यांचे तर अजून आयुष्य उभे व्हायचे आहे. आम्ही जसे बालपण आणि तरुणपण काढले त्यापेक्षा निश्चितच ह्यांचे बालपण व येणारे तरुणपण वेगळे आहे. आम्ही आठवड्यातून एकदा येणाऱ्या चित्रहार आणि शोथीमची आतुरतेने वाट पाहायचो पण आता माझी  मुलगी Mtv , Zoom वर कधीही पिक्चरच्या गाण्यावर थीरकते, ते पण काय कमी पडते म्हणून BTS  ची  गाणी U tube वर ऐकत असते. आमच्या तरुणपणी पण आल्बमचे थेर येऊन पोचले होते, आम्ही पण बाबा सह्गल, अल्ताफराजा, फाल्गूनी पाठकच्या गाण्यांवर फिदा होतो पण आता ह्या सगळ्यांचे पीक एवढे आले आहे की कधी "काटा लगा" येतो आणि गायब होतो ते समजतच नाही. आमच्या लहानपणी TV वर मालिका पण आठवड्यातून एकदाच यायच्या, पण आता डेली सोप बनून मालिके मधील केरेक्टर घरचे सदस्य बनले आहेत. गृहिणींसाठी ,अबाल वृद्धांसाठी डेली सोप जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत आणि मालिके मधील पात्र घरची मंडळी बनली आहेत. ह्या सर्व धावपळीत सध्या सोनी tv वरील बघ

बवाल

Image
                                                                                  नूकताच  बवाल सिनेमा बघितला, खूप दिवसांनी बॉलीवूड वाल्यांनी एक सुंदर निर्मिती केली आहे. एक असा सिनेमा जो पुऱ्या परिवारासोबत बसून बघू शकतो, आजच्या पिढीला आरसा दाखवणारा आणि समाजातले एक वास्तव दाखवणारा सिनेमा.  आज बरेचजण आपली एक खोटी इमेज बनवून आहेत आणि त्या इमेजला तडा जाऊ नये म्हणून एक खोट्याची दुनिया बनवतात आणि ती जपण्यासाठी अनेक उलटे सुलटे मार्ग वापरतात, त्यांना आपल्या इमेज पेक्षा बाकी सर्व गौण असतें आणि त्यासाठी आपली नाती गोती, मानवी मूल्ये या सगळ्यांना पायदळी तुडवण्यात त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही. खूपच आत्माकेंद्रित आणि स्वार्थी लोकं असतात ती. आपण आयुष्यात खूप मागे पडलो अशी खंत मनात सलत असते आणि जगाला दाखवण्यासाठी ते मग आपलें वेगळे विश्व उभारतात आणि तेच लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात.  अनेक वेळा लोकं रीझल्ट विसरतात पण त्या माणसाने दाखवलेला दिखाऊपणा लक्षात ठेवतात आणि ह्याच गोष्टींचा अशी लोकं फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात.  सिनेमा मधील शिक्षक वर्ल्ड वार शिकवण्यासाठी युरोप टूर ला जातो आणि हळू

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

Image
  आजच्या धावपळीच्या दुनियेत खरंतर मनाचे पण आरोग्य असतें हे आपण समजूनच घेत नाही, आपण  शरीराला   वेळ देत नाही तर मनाची तर बातच दूर. लहानपणी शाळेत मनाचे श्लोक पाठ केले होते पण त्यांचा अर्थ उमलून घेऊन तो जीवनात उतरवणे किती जणांना जमले असेल. समर्थांनी 205 श्लोक मनाला उद्देशून लिहिले आहेत, प्रत्येक श्लोक म्हणजे जीवन जगण्याचा, मनाला स्थिर ठेवण्याचा मंत्र आहे पण समर्थांच्या श्लोका पेक्षा कुठल्यातरी अमेरिकन किंवा यूरोपयन मनसोपाचार तज्ञाच्या लेख आपल्याला जास्त जवळचा वाटतो.  संत तुकाराम सांगतात 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण '. पण ते मन नेमके काय असतें ते आपण समजूनच घेत नाही. संत रविदास म्हणतात 'मन चंगा तो कठोती में गंगा ' पण चंगा म्हणजे काय? आपल्याला कुठे वेळ आहे त्याला चंगा वैगेरे ठेवायला. तुकाराम महाराज म्हणतात 'नाही निर्मळ मन तर काय करील साबण ' किती जण मनाच्या निर्मळ पणासाठी प्रयत्न करतात.  श्यामची आई श्यामला तळव्यासारखे मनाला पण मळ लागू नये म्हणून जपायला सांगते पण आपण ते विसरून गेलो आहे. बहिणा बाईंना मन खऱ्या अर्थाने समजले होते 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढ

लास्ट सीन...

Image
  आज   कालच्या   धावपळीच्या   जीवनात   आपल्याला   भेटलेली   व्यक्ती   पुन्हा   भेटेल   आणि   भेटली   तरी   पुन्हा   आधी   होती   तशीच   आपल्याशी   मिळेल   ह्याची   खात्री   नाही .  कदाचित   त्या   व्यक्तीची   भेट   आपली   लास्ट   सीन   असू   शकते . आपण   आपल्या   नातेवाईकांना ,  मित्रांना ,  जुन्या   कलीगना   कधी   लास्ट   बघितले   होते   तेही   आठवत   नाही   आणि   मग   आचानक   बातमी   येते   की   ती   व्यक्ती   आता   जगातून   निघून   गेली   आहे   आणि   आपल्यासाठी   ती   खरंच   आता   लास्ट   सीनच   आहे .  मग   सुरु   होतो   आठवणींचा   खेळ ,  आपण   त्याला   किंवा   तिला   कधी   लास्ट   बघितले   होते ,  बघितले   होते   फक्त   की   भेटणे   पण   झाले   होते ,  भेटलो   होतो   तर   काही   बोलणे   झाले   होते   का   असंच   हाय   हॅलो   झाले   होते ,  भांडण   तर   झाले   न्हवते   ना ?  त्याला   किंवा   तिला   आपण   मनमोकळे   पणे   भेटलो   होतो   की   जूने   हेवेदावे   उगाळून   फटकून   वागलो   होतो ? असे   बोलतात   की   आपल्या   आयुष्यात   आलेली   प्रत्येक   व्यक्ती   ही   विधात्याच्या   पूर्वन